मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा पहिला भाग आज प्रसिद्ध करत आहोत.
समीर लिमये मेकॅनिकल इंजिनीअर असून, be@art ही त्यांची कन्सेप्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे. अनेक नामवंत ब्रँड्ससाठी प्रमोशनल अॅक्टिव्हिटी, कॉर्पोरेट फिल्म्स, डॉक्युमेंटरी फिल्म्स, इमेज बिल्डिंग कन्सेप्ट्स, लेखन, स्टेज डिझाइन, ऑडिओ आणि व्हिडिओ प्रॉडक्शन, एडिट स्टुडिओ आदी कामे त्यांच्या कंपनीमार्फत केली जातात. समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळातही कसे तंतोतंत लागू पडतात, हे समजावून सांगण्यासाठी या विषयांवरील निरूपणे ते करतात.